Anxiety Disorder.
चिंतेचे आजार भीती हा माणसाचा नैसर्गिक गुण आहे. जेव्हा आपण आदिमानव होतो तेव्हापासूनच आपण घाबरत असावं. मोठा आवाज झाला की घाबरणे हे अगदी लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आपोआपच होते. वाघासारखा प्राणी पाहून देखील आपोआप भीती वाटते. या भीतीने आपल्याला जिवंत ठेवण्यात खूप मोठा मोठे योगदान दिले आहे. समोरून मोठा ट्रक येत असताना धाडस करून रस्ता ओलांडायचे ठरवले तर त्या माणसाला आपण बावळट म्हणू. तेव्हा वास्तववादी भीती असायला हवी. पण आपल्या मेंदूला कधी घाबरायचे आणि कधी घाबरायचं नाही हे शिकवण एक कठीण टास्क आहे. प्रमाणाबाहेरची भीती चिंता घेऊन येते. सतत काळजी वाटणे, अस्वस्थ वाटणे, खूप जास्त विचार मनात येत राहणे, इत्यादी लक्षणे जनतेच्या चिंतेबाबत दिसून येतात. चिंतेचे आजार साधारणतः 30 टक्के लोकांना कधी ना कधी होऊन जातात. पण चिंतेचे एका वर्षातील एखाद्या समाजातील प्रमाण दहा टक्के इतके असते. हे प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. याचा अर्थ चिंतेचे आजार समाजात सर्व दूर आढळतात. आपल्याला ते ओळखता येत नाहीत हा आपला दोष. मी काल अभ्यास करत असताना मला असे लक्षात आले की, लहानपणी समुपदेशन उपलब्ध असते आणि त्याबद्दल मला ...